"सफर भारतीय रेल्वेची"- 12137 Mumbai CSMT - Firozpur Punjab Mail.
१२१३७/३८ पंजाब मेल ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी "पंजाब मेल" मुंबई ते पंजाबच्या फिरोजपूर शहरांदरम्यान दररोज धावते.
.
१...
more... जून, १९१२ रोजी ही गाडी पहिल्यांदा धावली.
.
सुरुवातीच्या काळात मुंबई च्या बॅलार्ड पिअर स्थानकातून सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावर कडे जायची २,४९६ किमी चा दीर्घ पल्ला असलेली ही पहिली आणि सर्वात जलद गाडी होती. हे अंतर पार करण्यास तिला ४७ तास लागत. सुरुवातीला ही गाडी रोज सुटत नसे, टपाल नेण्याच्या दिवशीच ही गाडी प्रवासाला निघे. गाडीला एकूण ३ डबे होते आणि त्यात एकूण ९६ प्रवासी सामावले जात असत. "दि पंजाब लिमिटेड" हे या गाडीचे सुरुवातीचे नाव होते. जेव्हा ही गाडी मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसवरून सुटू लागली तेव्हा हीचे नाव "पंजाब मेल" झाले.
.
१९४७ साली भारत पाकिस्तान ह्या दोन देशांच्या विभाजनानंतर ट्रेनचे टर्मिनस भारत पाकिस्तान सीमेवरील फिरोजपूर येथे हलविण्यात आले.
.
मुंबईहून सुटण्याची वेळ - सायं ०७:३५ मि.
फिरोजपूर येथे पोहचण्याची वेळ - सकाळी ०५:१० मि. (तिसऱ्या दिवशी)
.
.
गाडीचा विभाग - मध्य रेल्वे
रेक - एल एच बी (LHB)
भोजनयान - आहे.
.
प्रवास वेळ - ३३ तास ३५ मिनिटे
एकूण अंतर - १९२८ किमी
एकूण थांबे - ५३
सरासरी वेग - ५७ किमी/प्रतीतास
.
.
रेल्वे गाडीचा मार्ग
.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते फिरोजपूर मार्गे कल्याण जंक्शन, भुसावळ जंक्शन, इटारसी जंक्शन, भोपाळ जंक्शन, बिना जंक्शन, झांसी जंक्शन, नवी दिल्ली, भटिंदा जंक्शन