click here
सोलापूर ते पुणे- मुंबई अंतर होणार कमी ! रेल्वेचे दुहेरीकरण- विद्युतीकरण अंतिम टप्प्यात
दुहेरीकरण व विद्युतीकरणानंतरचे अपेक्षित बदल...
सोलापूर...
more... : बिग-वन ते कलबुर्गीपर्यंत विद्युतीकरण व दुहेरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर 2021 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर गाड्यांच्या वेग वाढणार असून सोलापूर- पुणे, सोलापूर- मुंबईसह अन्य मार्गांवरील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट आणि शताब्दी व अतिजलद गाड्यांच्या संख्येतही वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सोलापूर विभाग हा मोठा टर्मिनस होण्यास मदत होणार आहे.
भविष्यात 160 ते 180 किलोमीटरचे अंतर प्रतितास वेगाने धावणार आहे. दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्या क्रॉसिंगला थांबणार नसल्याने चोरी, दरोड्याचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. लोकप्रतिनिधींनी रेटा लावल्यास सोलापूर विभाग हे आगामी काळात दक्षिण भारतातील बेंगलोर, म्हैसूर, तिरुअंनतपुरम, चेन्नई, तिरुपती आणि कन्याकुमारी या ठिकाणांना जोडणारे मोठे टर्मिनस होऊ शकते. त्यातून मोठा महसूल जमा होईल. दुसरीकडे सोलापूरहून गुजरात, राजस्थान या विभागातील सोलापूर- जयपूर, सोलापूर- अहमदाबाद, सोलापूर- वैष्णवदेवी, सोलापूर- वाराणसी व सोलापूर- नागपूर या गाड्या सोलापुरातून सुटण्यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे सोलापूर व माढ्यातील खासदारांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवासी सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.
गाड्यांचा वेग निश्चितपणे वाढेल विद्युतीकरण आणि दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्यांचा वेग निश्चितपणे वाढणार आहे. प्रवाशांना कमी वेळेत जास्त अंतराचा प्रवास करणे शक्य होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर विभागात कोणत्या गाड्या वाढतील, हे निश्चित होईल. - प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे